वाणी समाजामधील "सामाजिक उत्क्रांती व परिवर्तन"
- dileepbw
- Aug 30, 2023
- 1 min read
महाराष्ट्रातील "सका/शक/Scythian" वंशाच्या "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजामधील "सामाजिक उत्क्रांती व परिवर्तन"
इ.स.१९३० च्या सुमारास "महात्मा गांधीं" नी "मिठाचा सत्याग्रह" सुरु केला. त्यासाठी महाराष्ट्रातील "लाडसक्का/लाडसका/लाडशिक्के/लाडशाखीय वाणी" समाजाचे "समाजरत्न" श्री. नरहर गोपाळ अलई उर्फ “बागलाणचे बाबा" यांच्या उत्तेजनाने नामपूरचे श्री. नारायण गणपत खुटाडे व सोमपुरचे श्री. बापू सावळाराम वाणी हे दोन "लाडसक्का/लाडसका/लाडशिक्के/लाडशाखीय वाणी समाजाचे समाजबांधव" महात्मा गांधींनी आयोजित केलेल्या "मिठाच्या सत्याग्रहा" त सहभागी होण्यासाठी विलेपार्ले,मुंबई येथे रवाना झाले.
त्यांना "रत्नागिरी" जिल्ह्यातील "शिरोडा" येथे इंग्रज सरकारने अटक केली व २१ दिवस तुरुंगात ठेवले. त्यांनी मिठाच्या सत्याग्रहातून आणलेल्या मिठाच्या पुड्यांचा नामपूर येथे जाहीर लिलाव करण्यात आला व जमा झालेली ६६५० रुपयाची रक्कम बागलाण येथे नियोजित केलेल्या जंगल सत्याग्रहासाठी श्री. नरहर गोपाळ अलई उर्फ “बागलाणचे बाबा" यांच्याकडे जमा करण्यात आली.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६
Comentários